Social Icons

Image and video hosting by yuvrajmohite.com
Loading Ambika Mata Search....

“त्रिपुरारी पौर्णिमा २०१७”-tripurari purnima 2017

“सस्नेह   निमंत्रण”

“त्रिपुरारी पौर्णिमा २०१७”   

"तीर्थक्षेत्र श्री अंबिका मंदिर तोंडोली"

आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री अंबिका मंदिर तोंडोली, ता: कडेगाव, जि: सांगली येथे "त्रिपुरारी पौर्णिमा" आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे शुक्रवार दि:०३/११/२०१७ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत संपन्न होत आहे. या दिवशी संपूर्ण मंदिरात ११,१११ दीप (पणत्या) प्रज्वलित करण्यात येणार आहेत, मंदिरात दीप प्रज्वलन केल्यामुळे संकटे नाश पावतात. त्यामुळे असंख्य भक्तगण नवसा प्रमाणे मातीच्या पणत्या तेल व तूप घालून दीप प्रज्वलित करतात. मंदिर सभामंडपात रांगोळ्या काढल्या जातात. संपूर्ण मंदिराला भव्य विदयुत रोषणाई केली जाते. या दिवशी मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते.

सर्व देवांच्या तेजा पासुन उत्पन्न झालेली, पृथ्वी तलावरिल दुष्ट प्रवृतिचा वध करणारी अशी ही आदिमाया जगदंभा म्हणजेच तोंडोली गावची श्री अंबिका माता!श्री अंबिका मातेचे स्थान हे जागृत देवस्थान आहे।  श्री अंबिका मातेचे भव्यदिव्य मंदिर सर्व देणगीदार, हितचिंतक व अंबिका भक्त्यांच्या सहकार्यामुळे पूर्णत्वास येत आहे, मंदिराचे प्लास्टर व कलर काम पूर्ण झालेले आहे, वायरिंग व कळस इत्यादी शेवटच्या टप्प्यातील कामे राहिलेली आहेत, तरी या कार्यासाठी कुणाला देणगीरूपी मदत करायची असल्यास आपण  आवश्य देणगीरूपी मदत करू शकता. भविष्यात विविध समाजउपयोगी कामे करावयाची आहेत. श्री अंबिका मातेच्या मंदिरात वर्षभर अनेक उत्सव पार पडतात. वैशाख पौर्णिमेस देवीची वार्षिक यात्रा मोठया थाटात साजरी केली जाते. त्या दिवशी मंदिरात विद्दुत रोषणाई केली जाते. हाती बनविलेल्या शोभेच्या कमानी  प्रवेशद्वारावर लावतात. अनेक जण देवीच्या कृपशिर्वादाने इच्छापुर्ति झाल्याबद्दल वाजत गाजत नवस फेडण्यास येतात व पुढील आयुष्यात सुखशांती लाभो अशी देवी चरणी प्रार्थना करतात. हजारोंच्या संख्येने जमलेले भक्तगण हा ऐतिहासिक सोहळा पाहून क्रतार्थ होतात.  श्री अंबिका देवीच्या मंदिरात अश्विन शुध्द प्रतिपदे पासुन शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो. ह्या उत्सवातही दंडस्थान घेतले जाते. नऊ दिवस देवीची उत्सवमूर्ती वेगवेगळ्या रत्नजडीत सुवर्णालंकाराने सजविली जाते. मिती अश्विन वद्य द्वितीयासह् मंदिरामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण आयोजित केले जात होते. पारायण सात दिवसाचे असून पंचक्रोशितील असंख्य भक्त, हरिभक्त पारायण मंडळी व नामवंत कीर्तनकार कीर्तन प्रवचने देऊन रात्रभर जागरण करतात. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे संबोधतात. तुळशी विवाहानंतर ही पौर्णिमा येते. या दिवशी हजारो पणत्या प्रज्वलित केल्या जातात व देवळासमोरील दगडी दीपमाळ ही प्रज्वलित करतात हे नयन रम्य दृष्य पाहण्यास भक्तगण बहुसंख्येने उपस्थित रहातात.

पौष महिन्यात मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात सुहासिनी हळदी-कुंकू समारंभ साजरा करतात. मंदिराच्या आवारात महिला तर्फे विविध खेळ खेळून आनंदोत्सव साजरा केला जातो. अशा प्रकारे अनेक छोटे-मोठे उत्सव मंदिरात नित्यनियमाने पार पडतात. अशी ही तोंडोली क्षेत्री वास करून असलेली स्वयंभू जागृत आई जगदंभा, आई साजाबाई, श्री अंबिका माता भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तयार असते. तिच्या नामोच्चारणेही भक्तांची बरीच संकटे संपुष्टात येतात असा हा श्री अंबिका मातेचा महिमा आहे. तरी आई अंबिका आम्हा सर्वांना सदबुध्दि देवो व भक्तांस उदंड आयुष्य देवो.ही तिच्या चरणी मनोभावे प्रार्थना.

दीपावली असो वा त्रिपुरारी पौर्णिमा असो दीप उजळवून अंधकाराचा नाश करण्याची शिकवण देणारे हे भारतवर्षातले सण वा उत्सव आपल्याला आपल्या आदर्श, महान भारतीय परंपरेची ओळखच करून देतात. दिवे लावून परमेश्वरी कृपेच्या सत्याचा उजेड आपल्या मनात पडावा यासाठी असे दीपोत्सव आवश्‍यक असतात आणि त्यांपासून प्रेरणा घ्यायची असते ती निराशाजनक वातावरणातही न डगमगता खंबीरपणे, मनोधैर्य उंचावून, "त्या" एकावर, "त्या" च्या अगाध सामर्थ्यावर अढळ, अविचल श्रध्दा ठेवून जीवनात, "त्या" भगवंताच्या तेजाचा वारसा जागवायचा. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे मानवी जीवनात प्रकाश, उजेड, आनंद देणारा उत्सव. आपल्या मनातील क्रोध, द्वेष, मत्सर नाहीसा करून भगवान शिव-शंकराची पूजा करावी, आराधना करावी व सुख-शांती याची मागणी करावी. असा संदेश या उत्सवातून मिळतो.

      कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रुंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला, या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुध्दा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासूराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटली जाऊ लागली. या दिवशी घरात, घराबाहेर व मंदिरातही  दिव्याची आरास करून व नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. धर्म ग्रंथानुसार याच दिवशी महादेवाने तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांच्या त्रिपुरा (नगर) चा नाश केला. त्रीपुरांचा नाश केल्यामुळेच महादेवाचे एक नाव त्रिपुरारी असे पडले. अशी या उत्सवाची महती आहे. 

या उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं नियोजनही श्री अंबिका मंदिरात करण्यात आलेले आहे. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत असतात, श्री अंबिका मंदिर भक्तांच्या गर्दीमुळे तुडुंब भरलेले असते. संपूर्ण मंदिराला भव्य विदयुत रोषणाई केली जाते, त्यामुळे मंदिर परिसरात अतिशय सुंदर असा देखणा अविष्कार आपणास पाहावयास मिळतो. या सोहळ्याच्या निमित्ताने ज्यांना देणगीरूपी मदत करायची असेल तर आपण देणगीरूपीही मदत करू शकता. या दिवशी ज्यांना रांगोळी काढायची असेल, दीप प्रज्वलन करायचे असेल, तर आपण आवश्य सहकार्य करू शकता , आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच  सोहळा संपन्न होत असतो. तरी सर्व अंबिका भक्तांनी या "ना भूतो ना भविष्यती”अश्या “त्रिपुरारी पौर्णिमा” सोहळ्यास उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.     
आपले नम्र,
ग्रामपंचायत व समस्थ ग्रामस्थ तोंडोली,
जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्ट, मुंबई-ठाणे (तोंडोली),
श्री अंबिका ग्रामविकास मंडळ, तोंडोली.

Happy Navratri 2017 - नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा....
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.


जाहीर आव्हान

" अंबिका माता प्रसन्न "

सर्व तोंडोली ग्रामस्त ,सभासद व अंबिका भक्तांस सप्रेम नमस्कार
तोंडोली गावातील ग्रामस्त नोकरी धंद्याकरिता मुंबई-ठाणे-पुणे येथे आले आहेत,त्यापैकी काही जन एकत्र येऊन श्री अंबिका मंदिर सभा मंडप जीर्णोध्दार करण्याचा ध्येयाने प्रेरित होऊन जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्टची स्थापनासात सन २००१ साली तोंडोली ग्रामस्थाचा  बैठकीचा गळा क्र.१०/३१ शिवडी बी.डी.डी चाळ या पत्यावर झाली .सुरुवातीला रु.२५/- वर्गणी जमवून मंडळाचे सभासद करण्यात आले त्यानंतर रु.१००/- व रु.५००/- अजिव सभासद वर्गणी जमविण्यात आली तय्दार्म्यान सभासदाच्या माध्यमातून सन २००८ ते २००९ पर्यंत रु.७०००००/- (रु.सात लाख ) जमा झाले.

जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्टने तयार केलेली सभामंडप जीर्णोध्दाराची योजना ही अंदाजे दीड कोटी रुपयाची होती.वस्तूस्थिती पाहता कोट्यावधी रुपयाची  जीर्णोध्दाराची योजना पूर्ण करणे हे अशक्य असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना होऊ लागली आहे.तरी हनुमंताच्या वानरसेने प्रमाणे प्रत्येक सभासद जिद्दीने आपापल्या ताकदी प्रमाणे खारीच्या वाटयासारखे आर्थिक सहकार्ये करत होते.

त्या दरम्यान इमारतीचा नकाशा तयार करणे,आर्किटेक नेमणे,टेंडर नोटीस काढणे,वर्क ओर्डर देणे इत्यादी महत्वाची कामे सुरु केली.ट्रस्टची सेक्रेटरीनी पहिले पाऊल टाकण्याचे ठरविले ट्रस्टच्या पूर्व इतिहास पाहता ट्रस्टच्या स्थापणेपासून आठ ते नऊ वर्ष्यात रु.सात लाख जमा झाले.त्यामुळे पदाधिकारी कोणत्याही प्रकारे धोका पत्करण्यास तयार होत नव्हते.सदर बाब योग्याच होती.काम सुरु केले आणि निधी जमला नाही तर हा प्रश्न सर्वापुढे ब्राम्हराक्षासा सारखा समोर उभा राहिला होता अशा नाजूक परीस्थीतीत ट्रस्टच्या सेक्रेटरिनी जीर्णोध्दाराचे काम सुरु करण्याचा प्रस्ताव ट्रस्टच्या सभासदाच्या समोर ठेवला परंतु कोणतीही धोका पत्करण्यास सभासद तयार नवते तरीसुद्धा पहिले पाऊल टाकल्याशिवाय यश किवा अपयशाची परीक्ष्या देता येणार नाही असे मत सेक्रेटरीचे होते शेवटी सर्वानुमते अपयशाची तमा न  बाळगता उपलब्ध निधी मध्ये जीर्णोध्दाराचे  काम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्व प्रथम अंबिका भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून भक्त निवास शेडचे काम सुरु करण्यात आले त्या नंतर मुळ सभामंडप जीर्णोध्दाराचे काम सुरु करण्यात आले पहिले पाऊल उचलल्यामुळे यशाच्या वाटचाल सुरु झाल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला.श्री अंबिका मते चा आशीर्वाद व सर्व ग्रामस्थांची एकी व ट्रस्टच्या कार्याकार्तायंची मेह्नेत या सर्व बाबींच्या आधारे ती दुसरे पाऊल टाकण्याचा निर्णय ट्रस्टतर्फे घेण्यात आले जीर्णोध्दाराचे काम जसजसे होत गेले तसतसा निधी जमा होत गेला त्याला खरी साथ मिळाली ती ट्रस्टच्या सभासदांची व दानशूर देण्गीधारांची व हितचिंतकांची या सर्वांमुळे सभामंडप जीर्णोध्दाराचे खडतर प्रवास पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आले आहे आजमिती ९०टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. 
मागे वळून बघितले असता ह्या प्रवासात कडू गोड अनुभव आले.कार्यकर्त्यांची दमछाक होत होती.अनेक मतभेद निर्माण होत होते.आरोप प्रत्यारोप होत होते निधीची कमतरता भासत होती.वर्ष्या मागून वर्षे सरकत होती.बघता बघता १६ वर्षे कशी निघून गेली ते कळलेच नाही.कार्यकर्ते किती थकले तरी सभासमंडपाची उभी राहहिलेल्या मंदिर सभामंपाकडे बघितले कि पुन्हा नवचैतन्य येत होते पुन्हा आवश्यक निधी जमा होत होता त्या जमलेल्या निधीतून राहिलेले काम पूर्ण होत  होते या सर्व प्रवासाने सभामंडपाचे ९० टक्के काम पूर्ण झाले.हे याशाच्या वाटचालीचे धोतक आहे. १० टक्के काम पूर्ण झाले कि,आपण यशस्वी होऊ अशा आत्मविश्वास निर्माण झाला.

शिल्लक राहिलेल्या कामामध्ये तळघरातील प्लास्टर व लादिकाम पहिल्या माळ्यावर प्लास्टर व लादी काम सभामंडपाच्या जिण्याचे प्लास्टर ,इमारतीच्या बाहेरील प्लास्टर ,शोभेच्या देव देवतांच्या मूर्ती,साधू संतांच्या मूर्ती ,वायरिंगचे काम ,संपूर्ण रंगकाम इमारतीच्या सभोवताली वृक्षरोपण व गार्डनचे काम इत्यादी महत्वाची कामे करावयाची आहेत. त्या नंतर २१ कळस पितळेचे वाघ-सिंह, कासव मोठी घंटा इत्यादी कामे शिल्लक आहेत.याचा अंदाजे खर्च रु.७००००००/- एवढा अंदाजे अपेक्षित खर्च आहे.

पुन्हा एकदा अंबिका देवीच्या आशीर्वादाने शेवटचे यशस्वी पाऊल टाकण्याची वेळ आली आहे.सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जय अंबिका सेवा  मंडळाच्या माध्यमातून यश संपादन करायचे आहेत.त्याकरिता सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून शक्य तेवढे आर्थिक सहकार्ये करून कार्यकर्त्यांना भक्कम आधार देऊन पुन्हाएकदा जिद्दीने पर्यंत करून तोंडोली नगरी मध्ये इतिहास निर्माण करायचा आहे.सर्वांनी या सुवर्ण इतिहासाचे मानकरी व्हायचे आहे.
ही कलीयुगामध्ये तोंडोली मध्ये ८१ फुट उंचीचे व दहा हजार फुट क्षेत्रफळ असलेले मंदिर निर्माण होने ही पुरण काळात निश्चित्त झालेले देवदेवतांनी निश्चित केलेले देवकार्य आहे.ज्या अंबिका भक्तांनी या कामात सहकार्य केले आहे हे भक्त भाग्यवान आहेत.अजूनही ज्या ग्रामस्तानी या कार्यास सहकार्य केले नाही.त्यांना पुन्हा एकदा विनंती करत आहोत आपण ह्या देवकार्यास सहकार्य करण्याची संधी सोडू नये जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करावे .

त्याच बरोबर आजपर्यंत आलेल्या देणगीदारांच्या याद्या फायनल करण्याचे काम लवकर सुरु करण्यात येणार आहे.तरी ज्यांना आपण दिलेल्या देणगीत  वाढ अथवा नावात बदल करवयाचे असेल त्यांनी ट्रस्टच्या पाधाधीकार्यांशी संपर्क साधून आवश्यक तो बदल करून घ्यावा हि विनंती. रु.५०००/- वरील देणगी दिलेल्या देणगीदारांची नावे लादीवर ,कोरण्याचे काम सुरु केले जाईल.यावर्षी यात्रे निम्मित जास्तीत जास्त रोख देणगी देऊन सहकार्य करावे जेणेकरून सभामंडप जीर्णोध्दाराचे शेवटचा यशस्वी टप्पा पूर्णत्वास जाईल यात्रेनिम्मित येणाऱ्या देणगीदारांनी अंबिका भक्तांनी माहेरवाशिणी व पाहुण्र यांनी आपले मोबाईल नंबर,गावाचे नाव व स्वतःचे पूर्ण नावाची मंदिरात ठेवलेल्या नोंद वहीत नोंद करावी.जेणेकरून कलशरोहण कार्यक्रमाचे  निम्रंत्रण देणे आम्हाला सोपे होईल व आवश्यक पाहुणचार करता येईल.

‘अंबिका देवीच्या नावाने चांग भल’

आपले नम्र ,


जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्ट तोंडोली

Maha shivaratri


शिवशंकराला देवांचा देव महादेव मानतात. महादेवाचे मंदिर नाही, असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही. देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशकंराची आराधना केली जाते. 'हर हर महादेव...', अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात. सदाशिव, सांब, महेश, मंगेश, गिरिजापती, पार्वतीपती, भूतनाथ, नीलकंठ, चंद्रमौली, आशुतोष व महादेव असे नामस्मरण करून भाविक चराचरात सामावलेल्या शिवशंकराचा धावा करीत असतात. शिव हे दैवत मंगलमय, कल्याण करणारे असून त्यांच्यावर भाविकांची अपार श्रध्दा आहे. शिवकृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दुःख येत नाही, अशी श्रद्धा आहे.


ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे. विष्णू सृष्टीचा पालनकर्ता. शंकर तिचे संरक्षण करणारा आहे. यामुळेच भोलेनाथाला 'कैलासनिवासी' असे म्हटले जाते.



'आशुतोष' म्हणचे तत्काळ संतुष्ट होणारे. शिव तसाच आहे. समुद्र मंथनात निघालेले विष स्वत: प्राशन करून जगाचे कल्याण करणार्‍या शिवाला 'नीळकंठ' असेही संबोधले जाते. शिवाच्या मस्तकावर गंगा व चंद्र यांचे स्थान आहे. म्हणून त्यांना 'त्र्यंबकेश्वर' असेही म्हणतात. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रामध्ये सर्व प्रकारचे दु:ख नष्ट करण्‍याची शक्ती आहे.



'शिव' म्हणजे पापाचा नाश करणारे, त्या आधी असणारा 'नमः' हा शब्द मोक्ष प्रदान करणारा आहे. उमा-महेश्वर हा देवादी देव महादेव आहे. 'नम: शिवाय' या पाच अक्षरी मंत्रात अद्भुत सामर्थ्य असून तो जगाचे कल्याणासाठी सार्थ ठरला आहे.



शिवाला बेलपत्र प्रिय:



एका कथेनुसार...एकदा विष्णुची पत्नी लक्ष्मीने श्रावण मासात शिवलिंगावर प्रतिदिन 1001 पांढरे कमळाची फुले वाहण्याचे व्रत करण्‍याचे ठरविले. लक्ष्मीने परडीत मोजून कमळे ठेवली. मात्र मंदिरात पोहचल्यानंतर तीन कमळाची फुले कमी भरली. त्याचे लक्ष्मीला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिने फुलांवर पाणी शिंपडले आणि चमत्कार झाला. फुलांमधून एक रोपटे बाहेर आहे. त्याला त्रिदलासारखी पाने त्याला होती. ते बेलाचे रोपटे होते. त्यावरील बेलपत्र लक्ष्म‍ीने तोडून शिवलिंगवर वाहिली. लक्ष्मीच्या भक्तिमधील सामर्थ्य पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले व तेव्हापासून ‍शिवशंकराला बेलपत्र प्रिय आहे. भक्तावर तत्काळ प्रसन्न होणारा शिवशंकर खरोखरच महादेव आहे.

हळदी कुंकू समारंभ २०१६


जे. ए. एस. एम. ट्रस्ट तर्फे रविवार दिनांक ३१-०१-२०१६ रोजी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत  हळदी कुंकू समारंभ आयोजित केला आहे.


कार्यक्रमाचे स्थळ – ऑल इंडिया भावसार क्षत्रिय महाजन वाडी सभागृह, परमार गुरुजी मार्ग, सेन्ट्रल रेल्वे, वर्कशॉप समोर, परेल, मुंबई - १२ तरी सर्व सभासद / महिलासभासद व तोंडोली ग्रामस्थांनी या समारंभात सहकुटुंब उपस्तीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.


Widgets
 

सन्माननीय सभासद आणि तोंडोली ग्रामस्थ. व सर्व अंबिका माता भक्तजन यांसी जाहिर आवाहन.. Open Announcement

X